Sunday, December 21, 2014


आर्य- एक संस्कृती !
(Aryan Culture : Article published in Maharashtra Times on Sunday, 21-12-2014) 


१९ व्या शतकाच्या सुरुवातीला ‘आर्यवंश’ नामक एक प्राचीन वंश अस्तित्वात असून त्याच वाडमय आणि संस्कृती अत्यंत संपन्न होती असा समज पसृत झाल्यावर आपण (सुद्धा !) आर्य असल्याची घोषणा अनेक देशांनी करून टाकली. ग्रीक लोकांचंच उदाहरण घेऊ. पूर्वी ते स्वतःला ‘हेलनिक’ म्हणजे ट्रोजन युद्धातल्या हेलनचे वंशज म्हणवत असत. पण पुढे ऑटोमन साम्राज्याविरुद्ध उभारलेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दरम्यान (१८२१ ते १८३२) स्वतःच्या आर्यत्वाची संकल्पना त्यांनी प्रथम मांडली. आपल्या आर्यत्वाच्या आधारावर युरोपातील अन्य देशांची मदत घेण हा त्यामागचा उद्देश होता. कारण आर्यवंशाच्या श्रेष्ठत्वाचं मिथक नुकतंच निर्माण झालं होतं आणि आपण त्याच वंशातले आहोत असा दावा युरोपातल्या अनेक देशांनी केला होता. ग्रीकांची ही युक्ती यशस्वी झाली आणि युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया वगैरे देशांची मदत मिळवून ते स्वतंत्र झाले.

पुढे जर्मनांनी तर मोठ्या अभिनिवेशाने आपण आर्यवंशीय असल्याचा दावा केला होता. पण त्यांच्याच देशातले
विर्को सारखे संशोधक; टोल्किन, मान यांच्यासारखे साहित्यिक किंवा विल्यम फोदोर सारखे पत्रकार यांनी हा दावा हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं. आणि ते खरंही होतं. कारण या लोकांच्या इतिहासात ‘आर्य’ हा शब्द तोवर कधी आलेला नव्हता, आर्यांची संस्कृती यांच्या संस्कृतीहून भिन्न होती आणि इतिहासही वेगळा होता.

जर्मनांप्रमाणेच रोमन लोकांच्या इतिहासातही ‘आर्य’ हा शब्द आढळत नाही किंवा आर्य संस्कृतीच्या खुणा सापडत नाहीत. इसवी सनापूर्वी सातव्या शतकात ग्रीक लोक इटलीच्या सिसिली वगैरे भागात जाऊन स्थायिक झाले म्हणून काही देवघेव झाली एवढंच. तरीही रोमन लोक आर्य असल्याचा दावा करण्यात येतो. रोमन भाषा ‘इंडो-युरोपियन’ भाषा समूहातली एक भाषा आहे एवढाच या दाव्याला आधार. मुळात ‘इंडो-युरोपियन भाषा समूह’ ही संकल्पना सुद्धा तशी फसवी आहे. थोमस यंग या १९ व्या शतकातील इंग्रज शास्त्रज्ञाने ही संकल्पना प्रथम मांडली. युरोपातील ४०० भाषांपैकी कमीतकमी निम्म्या भाषांचं संस्कृतशी साधर्म्य आढळ्त असं त्याचं म्हणणं होतं. अर्थात तसं म्हणणारा तो पहिलाच नव्हता. १६ व्या शतकात जेव्हा युरोपियन प्रवासी आणि अभ्यासक भारतभेटीसाठी येऊ लागले तेव्हा संस्कृत आणि युरोपियन भाषा यांच्यात काही शब्द सारखे असल्याचं त्यांच्या लक्षात येऊ लागलं होतं. संस्कृत मधील देव, सर्प, सप्त, अष्ट, नव वगैरे शब्द आणि रोमन भाषेतील दिओ (Dio), सेर्पे (Serpe), सेत्ते (Sette),  ओट्टो (Otto),  नोवे (Nove) अशासारखे शब्द यांच्यात साम्य आढळल्यामुळे भाषिक अभ्यासाला सुरुवात झाली. याच दरम्यान संस्कृत वाडमय समृद्ध असल्याचे आणि आर्य संस्कृती पुरातन असल्याचे पुरावे बाहेर पडत होते. या सगळ्याचा परिपाक म्हणून ‘इंडो-युरोपियन भाषा समूहातल्या भाषा बोलणारे ते आर्य’ असा एक निष्कर्ष काढला गेला. पण हा निष्कर्ष सपशेल चूक होता.

आपण आर्य असल्याचा दावा युरोपियन देशांनी केवळ भाषेच्या आधारावर केला होता. पण नुसत्या भाषेच्या आधारावर असले निष्कर्ष काढणं पुरेसं नसतं. याबाबतीत एक उदाहरण द्यायला हरकत नाही. ‘लिथुआनिया’ हा बाल्टिक देश उत्तर युरोपात वसला असून त्याच्या सीमा पोलंड, रशिया, बेलारूस वगैरे देशांच्या सीमांना भिडलेल्या

आहेत. लिथुआनियन भाषेचं संस्कृत भाषेशी विलक्षण साम्य असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. पण हे साम्य सोडलं तर त्यांच्या आणि आर्यांच्या इतिहासात किंवा संस्कृतीत काहीच सारखेपणा आढळत नाही. त्यांच्या इतिहासात एवढाच उल्लेख आहे की इ.स.पूर्व १० व्या सहस्रकाच्या सुमारास एक मोठा प्रलय झाला, तेव्हा स्थलांतर करून हे लोक सध्याच्या जागी आले. यानंतर मधल्या काळातला इतिहास त्यांच्याकडे उपलब्ध नाही. जे वाडमय उपलब्ध आहे ते इ.स. १००९ च्या नंतर निर्माण झालेलं आहे. त्यातही आर्य संस्कृतीचं दर्शन घडवणारं काहीच नाही. त्यामुळे भाषा सारखी असूनही त्यांना आर्य म्हणून संबोधता येत नाही.   

अलिकडेच झालेल्या संशोधनावरून ग्रीक हे ‘अर्धवट आर्य आणि अर्धवट नॉर्डीक’ होते ही बाब स्पष्ट होत आहे.
ग्रीकच नव्हे; तर फ्रेन्च, रोमन, इंग्रज आदी बहुतेक युरोपियन हे ‘नॉर्डीक वंशीय’ असून घरे किंवा निळे डोळे, पांढरा वर्ण, सोनेरी केस, उंच बांधा ही त्यांची शारीरिक वैशिष्ठ्ये मानली जातात. हे लोक अर्यांपासून निराळे व कॉकेशीयन वंशाला जवळचे आहेत. जनुक संशोधनाने ही गोष्ट सिद्ध झाली असून केवळ फिनलंड मधील लोक युरोपियन लोकांपेक्षा वेगळे असल्याचं निष्पन्न झालं आहे. (इथे हेही सांगायला हरकत नाही, की नेशनल जीआग्रफिक सोसायटी, आय.बी.एम आणि बेल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जनुकीय प्रयोगांमधून ‘आर्य आणि द्रविड वेगळे नव्हते’ असा निष्कर्ष बाहेर पडला आहे.)

आर्य संस्कृती
आर्य हा ‘वंश’ किंवा ‘भाषासमूह’ असण्यापेक्षाही ती एक ‘संस्कृती’ (Civilization) होती.  ही संस्कृती अतिशय प्राचीन होती आणि या लोकांचं वाडमय फार समृद्ध होतं. आर्यांचं वाडमय म्हणजे संस्कृतमध्ये मौखिक पद्धतीने टिकवून ठेवलेले वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, अरण्यके, सूत्रे, पुराणे इत्यादी साहित्य आणि रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये.
या वाडमयातून आर्यांच्या संस्कृतीचंही दर्शन घडतं. त्याशिवाय इतिहास, अध्यात्म आणि निरनिराळ्या शास्त्रांच्या प्रगल्भ चर्चेमुळे हे वाडमय संपन्न मानलं गेलं. 
आर्यांची संस्कृती म्हणजे काय हे दयानंद सरस्वती यांचा दाखला देऊन थोडक्यात खालील प्रमाणे सांगता येईल,
-ओंकारस्वरूपी निराकार परमेश्वराची निर्गुण उपासना.
-वेदांवर श्रद्धा. 
-चतुर्वर्ण्य व जातिव्यवस्थेवर विश्वास.
-आत्म्याचे अमरत्व आणि पुनर्जन्म यावर विश्वास.
-यज्ञसंस्था व कुटुंबसंस्था यांना महत्व.
-गो पूजन, गुरु पूजन, अतिथी पूजन यांना महत्व.
एखाद्या मानवसमूहाने आपण आर्य असल्याचा दावा केला तर त्यांच्या संस्कृतीत वरील गोष्टी बसत होत्या का हे पाहण गरजेचं आहे. बसत असतील तर ते आर्य होते, नसतील तर नव्हते असं मानण भाग आहे. भारतात आज मूर्तीपूजा बोकाळलीय आणि निर्गुण उपासना अपवादानेच केली जाते, चतुर्वर्ण्य व्यवस्था अवलंबिली जात नाही; असं असलं तरी पूर्वी या गोष्टी आचारल्या जात होत्या याचे दाखले मिळतात. शिवाय जातिव्यवस्था, कुटुंबाला प्राधान्य, गुरुशिष्य परंपरा, अतिथीचं आदरातिथ्य हे सर्व आजही पाहायला मिळत. त्यामुळे भारतीयांच्या आर्यत्वाबद्दल शंका घेतली जाऊ शकत नाही. युरोपियन देशांच्या बाबतीत मात्र अशी शंका घेतली जाऊ शकते.                

 आर्नोल्ड टोइनबी यांचा १२ खंडात उपलब्ध असलेला ‘ए स्टडी ऑफ हिस्टरी’ हा गाजलेला ग्रंथ. या ग्रंथात जगातल्या २६ संस्कृतींचा (Civilizations) उदय आणि अस्त यांचा आढावा घेतला आहे. त्यात बेबिलोनियन, इजिप्शियन, अरेबियन, सिनिक, मेक्सिकन, मायन अशा निरनिराळ्या संस्कृतींचा समावेश आहे; मात्र आर्य संस्कृतीचा नाही.
त्या ऐवजी ‘इंडिक’ (म्हणजे सिंधू) आणि ‘हिंदू’ अशा दोन वेगवेगळ्या संस्कृती दाखवल्या आहेत. टोइनबी हे अन्य युरोपियन इतिहासकारान्प्रमाणेच ‘बायबलग्रस्त’ असल्यामुळे त्यांना कुठल्याही संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ४ थ्या सहस्रकाच्या पलीकडे न्यायची इच्छा नव्हती. (कारण त्यामुळे ‘जगाची उत्पत्ती केवळ चार हजार वर्षांपूर्वी झाली’ असं म्हणणारं बायबल खोटं ठरणार होतं !) हिंदू किंवा सिंधू संस्कृती ऐवजी ‘आर्य संस्कृती’ म्हटलं असत तर त्या संस्कृतीचा कालावधी सिंधू संस्कृतीच्याही मागे जाण्याचा धोका होता. त्यामुळे ‘वेदांचा काळ’ वगैरे चर्चेत ते पडलेच नाहीत. आर्यांच्या संस्कृतीचा धसका घेणारे असे बरेच इतिहासकार त्या काळात युरोपात होऊन गेले. 

मूळ स्थान व स्थलांतर
आर्यांच्या संस्कृतीचं दर्शन आज केवळ भारतातच घडत असल्यामुळे भारत हेच आर्यांचं मूळस्थान असल्याची भूमिका हिंदुत्ववादी संशोधक घेत असतात. इंग्रजांनी भारतीय इतिहासचं विकृतीकरण केलं असलं तरी ‘आर्य बाहेरून आले’ हे त्यांचं म्हणण चूक वाटत नाही. आर्यांचं मूळस्थान उत्तरध्रुव असल्याचा सिद्धांत लोकमान्य टिळक यांनी प्रथम मांडला.
या सिद्धांताला अन्य पुराव्यांचीही जोड मिळते. वराह मिहीर याने ‘पंचसिद्धान्तिका’ मध्ये मेरू पर्वत उत्तर ध्रुवावर असल्याचा निर्देश केला आहे. उत्तरायणात मृत्यू येणं हे पुण्यकारक मानण्याची परंपराही आपले पूर्वज उत्तर ध्रुवावरून आले हेच दाखवते. (कारण दक्षिणायनात तिथे पूर्ण अंधार असायचा व अग्नीचा शोधही तेव्हा लागलेला नव्हता त्यामुळे कमालीची गैरसोय होत असे.) पारशी हे मुळात आर्य. पारशांचा देव ‘अहुर माझदा’ याने त्यांच्यासाठी जे सोळा सुंदर प्रदेश निर्माण केल्याचं ‘अवेस्ता’ मध्ये म्ह्टलं आहे; त्या यादीत उत्तर ध्रुवाचा क्रम पहिला, बाल्हिकचा चौथा, जुन्या शरयू नदीचा सहावा, सरस्वती नदीचा दहावा तर सप्तसिंधूचा पंधरावा दिलेला आहे. (वेन्दिदाद :फर्गर्द १) यावरून आर्यांचा उत्तर धृवाकडून दक्षिणेकडे कसकसा प्रवास होत गेला याची कल्पना येते आणि सप्तसिंधू हे आर्यांचं पाहिलं नव्हे, तर बरच नंतरचं वसतीस्थान असल्याचं दिसून येतं. (या निमित्ताने पारशी लोक सरस्वती नदीपर्यंत येऊन परत इराणकडे गेले हेही समजतं. कारण अवेस्तात गंगा-यमुना नद्यांचा अजिबात उल्लेख नाही.) 

मनुची नौका आणि प्रलय यांची कथा बहुतेक सर्व धर्मग्रंथांत सांगितली आहे. प्रलयानंतर ही नौका ‘अरारत’ (Ararat) पर्वताच्या उतारावर पोहोचली असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळतो. हा पर्वत तुर्कस्थानात असून त्यांच्या पूर्वेकडे १६ कि.मी. अंतरावर इराणची हद्द, तर उत्तरेकडे ३२ कि.मी. अंतरावर आर्मेनियाची हद्द येते. या पर्वताला पूर्वी ‘उरर्तु’ (Urartu) म्हणत. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते हा ‘वृत्र’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होय.

इंद्र आणि वृत्र यांच्या पाण्याच्या प्रश्नावरून झालेल्या लढायांची वर्णने वैदिक वाडमयात सुप्रसिद्धच आहेत. यातील इंद्र म्हणजे ज्यांना आपण देव मानतो त्या ‘सुर’ नामक प्रगत लोकांचा पदसिद्ध राजा. अर्यानप्रमाणेच हे सुर लोकही प्रलयातून बचावून वृत्र पर्वताला लागून असलेल्या प्रदेशात स्थायिक झाले असावेत. सुरांचा प्रदेश म्हणून त्याला ‘सुर्य’ म्हणत. शेजारी लागून असलेल्या प्रदेशात असुरांची वसती झाली होती त्याला ‘असुर्य’ म्हटलं जाई. सुर्य म्हणजे आजचा ‘सिरीया’ व असुर्य म्हणजे आजचा ‘इराक’ होय. वेदांतल्या उल्लेखाप्रमाणे देवांच्या राज्याला पाणी पुरवणाऱ्या नद्या वृत्राच्या उंचावर असलेल्या प्रदेशातून खाली वाहत असत. पण वृत्र देवांचं पाणी बंद करत असे. म्हणून देवांचा राजा इंद्र हा वृत्रांचे किल्ले किंवा गड फोडी आणि पाणी मोकळं करी. या पाण्याचे लोंढे देवांच्या नि आर्यांच्या प्रदेशात तर वाहत असतच, पण समुद्रातही शिरत. हे वर्णन या ‘मेसापोटेमिया’च्या प्रदेशाशी अचूक जुळतं. सप्तसिंधू किंवा

सरस्वती नदीच्या बाबतीत जुळत नाही. कारण समुद्र तिथून शेकडो मैल लांब आहे. तात्पर्य, प्रलयाविषयीच्या पुराणकथा, मनुची नाव, अरारत पर्वत आणि इंद्र व वृत्र यांच्या लढाया हे सगळं एका सूत्रात बांधलं की पुढील गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. 

कश्यप समुद्रापाशी वास्तव्य
वृत्र पर्वतापाशी पोहोचलेले आर्य कश्यप समुद्रापाशी जाऊन स्थायिक झाले. हा भाग सध्या आर्मेनिया, अझरबैजान  आणि इराण यांनी व्यापलेला आहे. कश्यप समुद्र हा जगातला सर्वात मोठा ‘बंदिस्त जलाशय’ असून कुरा, तेरेक, उरल, व्होल्गा आणि अमुदर्या या नद्या या जलाशयाला मिळतात. यापैकी केवळ कुरा ही एकमेव नदी अझरबैजान देशातून वाहते. या नदीवरूनच ‘कुरु’ किंवा ‘सायरस’ सारखी संबोधने निर्माण झाली आहेत. कश्यप समुद्राच्या काठी आर्य बराच काळ स्थायिक झाले असावेत. कारण नंतर ते स्वतःला ‘काश्यप’ म्हणवून घेऊ लागले. पुढे भारतात आल्यावर अर्यांमध्ये गोत्र सांगण्याची पद्धत रूढ झाली तेव्हा मागाहून त्या प्रदेशातून आलेल्या आणि गोत्र नसलेल्या ब्राह्मणांना ‘गोत्रस्य त्वपरिज्ञाने काश्यपम गोत्रमुच्यते’ या नियमानुसार ‘काश्यप’ हेच गोत्र दिलं जाई. किंबहुना आजही हा प्रघात चालू आहे. धर्मविषयक कर्मकांड करत असताना यजमानाला गोत्र माहीत नसेल तर भटजीलोक ते ‘काश्यप’ धरून पुढले विधी करतात. हा नियम किंवा प्रघात म्हणजे आर्य कश्यप समुद्राच्या परिसरातून आले याचा एक पुरावाच म्हणता येईल.                                                                                                        
भारतात येऊन पोहोचल्यावर स्थानिक अनार्यांशी आर्यांचा संबंध आला. त्यात दास, पणि, व्रात्य, नाग, गरुड, यक्ष, अज, शीघ्र, याक वगैरे जमाती होत्या. त्यांच्याशी आर्यांचा संघर्ष होणं साहजिकच होतं. मात्र कालांतराने संबंध सुधारले तेव्हा सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. वर्णव्यवस्था न मानणाऱ्या स्थानिकांना ‘अवर्ण’ म्हणून समाज व्यवस्थेत सामावून घेण्यात आलं. मूर्तीपूजा नि जातिव्यवस्था आर्यांनी स्थानिकांकडून उचलली. 


सिंधू संस्कृती ही तर आर्य आणि पणि यांची संयुक्त वसाहत असावी असा अंदाज आहे. कारण आर्यांच्या यज्ञकुंडांचे अवशेष तिथे मिळाले आहेत. अशातऱ्हेने स्थानिकांशी जुळवून घेत गेल्याने आर्य संस्कृती टिकून राहिली पण तिच्यात काहीशी सरमिसळ झाली. त्यामुळे आजच्या भारतीय नागरिकांची जात किंवा धर्म कोणताही असो, त्यांची संस्कृती मात्र एकच असते. हजारो वर्षं राजकीय आणि धार्मिक वर्चस्व गाजवणार्या आर्यांचीच संस्कृती म्हणून ती ओळखली जाण हे अपरिहार्य आहे. 

(आगामी ‘आर्यभारत’ या ग्रंथातून अंशतः उधृत.)      




***

                                                                                      

Thursday, October 9, 2014

Germans were never Aryans

Before Hitler, Germans never claimed that they were Aryans. You won’t find the word ‘Arya’ in their history. Their culture doesn’t have any similarity with Aryan culture.
No doubt, you may find some linguistic similarity between Sanskrit and German languages limited to few words, however, you cannot find literary evidences of Germans being Aryans unlike Indian and Iranian people. 

In spite of this, Hitler ‘hijacked’ the concept of Aryanism just to loosen the grip of the Jewish community over the financial structure of Germany.  
He misused the baseless theory of White Aryanism propounded by the couple of European writers just during 2-3 decades before Hitler’s time. The background was as under.

Background
In 1853, Maxmueller, the so called German scholar, put forth the concept of ‘Aryan Race’ for the first time and subsequently retracted it back in 1888 after realizing the splendid culture and rich literature of Indian Aryans. He then declared it as a ‘Linguistic Group’ rather than a ‘Race’. It might be remorsefulness or might be an attempt to introduce White Aryanism in Germany; nonetheless, two particular European people viz. Gobineau and Chamberlain had already grabbed the opportunity and propounded a different story about the purported Aryan Race.

French writer Joseph Arther Comte de Gobineau (1816-1882) published his theory through his book ‘The Inequalities of Human Races’ that ‘Aryan is the supreme race of all races and if at all pure Aryans exist today, they might exist in Germany.’  

Huston Chamberlain (1855-1927) a British author who had settled in Germany after getting married with a German woman, stressfully proclaimed in his book ‘The Foundation’ that White was the superior race and Germans were the only pure Aryans.

Although the afore-said claims did not have any base and proofs, Nazi Ideologue Alfred Rosenberg used the contents of both the books to build his Aryan Race Supremacy theory and thus helped Hitler to flash it throughout the Nazi Germany. (For this Rosenberg was hanged in Nuremberg later on !)  

Criticism
This Aryan theory advocated by Hitler was immediately criticised and ridiculed by the then German scholars.

German Scientist Virchow believed that the so called Aryan theory was nothing but a myth. According to German novelist and Nobel Laureate Thomas Mann, Germans often go to such extreme due to the natural destructive genes resting in the Germanic blood. This theory, he says, is nothing but the outcome of the Germanic inferiority complex against the successful & rich countries like England and France.  

Mike William Fodor, the Chief Editor of the popular newspaper in Germany ‘DNZ’ expressed the same views in ‘The Nation’ in 1936. ‘This is kind of attempting to transform inferior feelings into superior ones’ he wrote.

The most remarkable blow was from the ‘Hobbit’ and ‘Lord of the Rings’ fame German writer J.R.Tolkin.  In 1938, when German publishers decided to bring out German edition of his English books, they requested him to submit the proof of his Aryan origin as required under the Nuremberg Act. Tolkin, thereupon, wrote the following letter to the so called publishers.         
       
25 July 1938
20 Northmoor Road, Oxford
Dear Sirs,
Thank you for your letter. I regret that I am not clear as to what you intend by arisch. I am not of Aryan extraction : that is Indo-Iranian; as far as I am aware none of my ancestors spoke Hindustani, Persian, Gypsy or any related dialects.
But if I am to understand that you are enquiring that I am of Jewish origin, I can only reply that I regret that I appear to have no ancestors of that gifted people. My great-great-grandfather came to England in the eighteenth century from Germany: the main part of my descent is therefore purely English, and I am an English subject-which should be sufficient. I have been accustomed, nonetheless, to regard my German name with pride, and continued to do so throughout the period of the late regrettable war, in which I served in the English army. I cannot, however, forbear to comment that if impertinent and irrelevant inquires of this sort to become rules in matters of literature, then the time is not far distant when a German name will no longer be a source of pride.
Your enquiry is doubtless made in order to comply with the laws of your own country, but that this should be held to apply to the subjects of another state would be improper even if had (as it has not) any bearing whatsoever on the merits of my work or its sustainability for publication, of which you appear to have satisfied yourselves without reference to my Abstammung. (genealogy or ancestry)
I trust you will find this reply satisfactory, and
Remain yours faithfully,
J. R. R. Tolkien

Germans were Dasyus !  
If Germans were not Aryans, the question would naturally be asked as to who were they ?
They call themselves as ‘Deutsch’ and Germany is also called as ‘Deutschland’.
So far, however, we do not find satisfactory etymology of the word Deutsch. According to the Indian Historian V.K.Rajwade, ‘Deutsch’ came from ‘Dasyu’ mentioned in Vedas. Dasyus were not Aryas, nonetheless, they were enemies of Aryas. The Sanskrit meaning of the word Dasyu is ‘Those who are strangers…distant for Aryas’. The etymological chain could be given as under :
Dasyu > Deisyu > Deuschyu > Deutsch.  

Long ago; say about 10,000 years back, while Germans were the inhabitants of Danube valley at the western coast of Black sea, Aryans had settled at the eastern side on the coast of Caspian sea. (‘Danube’ is mentioned as ‘Danu’ in Vedas.) In their attempt to occupy more and more land to meet their growing needs it is very much possible that Aryans had to fight with Germans i.e. the then Dasyus. This continuous interaction might have exchanged few words here and there; that’s why the linguistic similarity, that’s all !   


(Partially extracted from the book under progress ‘AryaBharat’ by Harshad Sarpotdar    

 All Rights Reserved.)

Friday, January 10, 2014

मनुस्मृती - एक अलौकिक ग्रंथ !
(Manusmruti - An Extra-ordinary work !)

वाचण्यापेक्षा जाळण्यासाठीच जास्त प्रसिद्ध असलेल्या 'मनुस्मृती' या ग्रंथाविषयी माझ्या मनात खूपसं औत्सुक्य आणि बराचसा गैरसमज होता. 'मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्र यांच्यावर अन्याय केले, तिने ऐंशी टक्के माणसांना गुलाम ठरवलं, तिने अस्पृश्यता निर्माण केली' अशासारखी विधाने वाचण्यात आणि ऐकण्यात येत होती. तेव्हा हे प्रकरण आहे तरी काय असं वाटून मध्यंतरी मनुस्मृतीची एक प्रत वाचण्यापुरती मिळवली. ती वाचल्यावर आणि तिच्यावर अनेकांनी केलेलं भाष्य, तिची पूर्वपीठीका वगैरे समजून घेतल्यावर मूळ मनुस्मृतीसारखा अलौकिक ग्रंथ दुसरा नाही अशी माझी धारणा झाली. इथे 'मूळ' या शब्दाला काही विशिष्ठ अर्थ आहे. याबाबतीतली माझी निरीक्षणे खाली देतो :   

१) मूळ मनुस्मृती निर्माण केली गेली ती महाभारतापूर्वी अदमासे शंभर पिढ्या - म्हणजे तीन हजार वर्षे आधी. महाभारत इ. स. ३१०१ वर्षांपूर्वी झालं असं आज मानलं जातं. म्हणजे मूळ मनुस्मृतीला आज आठ हजार वर्षे होऊन गेली. या उलट  अलीकडे उपलब्ध असलेली मनुस्मृती ही भृगु कुळातल्या कुणा ऋषीने सांगितलेली केवळ दोन हजार वर्षांपूर्वीची आवृत्ती आहे. ती विपर्यस्त स्वरुपात असून तिच्यात किमान १७० प्रक्षिप्त श्लोक असावेत असं             कुक्कुलभट या टीकाकाराचं म्हणणं आहे. तर दयानंद सरस्वती यांच्या मते (पहा- 'सत्यार्थ प्रकाश') नंतर घुसडलेल्या श्लोकांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असावी. हे श्लोक अर्थातच ब्राह्मण शास्त्री-पुराणिकांनी आपल्या स्वार्थासाठी नंतर घुसवलेले असावेत. या घुसखोर श्लोकांमुळे या आवृत्तीत विसंगती निर्माण झाली असून तिचे समर्थक आणि विरोधक आपापल्या सोयीचा भाग घेऊन आज भांडत बसलेले दिसतात.      

२) आठ हजार वर्षांपूर्वी मनुकडे समाजरचनेचे काम आले तेव्हा त्याला आर्य आणि एत्तदेशीय या सर्वांची व्यवस्था करायची होती. ती करताना त्याने नेमनियम केले. ते पाळणार्यांना त्याने 'सवर्ण' म्हटलं आणि न पाळणार्यांना 'अवर्ण' म्हटलं. वेद रचायला व म्हणायला लागणाऱ्या बुद्धीच्या निकषांवर त्याने सवर्णांचे द्विज आणि    शूद्र असे दोन भाग केले. या द्विजांचे त्याने पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार भाग पाडले. हे चार वर्ण आणि पाचवे अवर्ण मिळून त्याने समाजाचे 'पंचजन' निर्माण केले. या पंचजनांचा राज्याभिषेकापासून प्रत्येक गोष्टीत त्याने सहभाग ठेवला नि     जबाबदार्या वाटून दिल्या. याप्रमाणे समाजातील सर्व घटकांना  त्याने कामधंदा मिळवून दिला. इतकी नामी व्यवस्था करणारा मनुस्मृती  हा जगातला पहिलाच ग्रंथ होता. तो वाचून प्रसिद्ध युरोपिअन तत्वज्ञ नित्शे याने उद्गार काढले, की 'बायबल फेका नि मनुस्मृती हाती घ्या !'         

३) केवळ ब्राह्मणांनाच नव्हे, तर स्त्रिया आणि शुद्र यांनाही मनुने काही अधिकार सांगितले आहेत, त्यांच्यावर जबाबदार्या दिल्या आहेत, त्यांची काळजी कशी घ्यावी ते सांगितलेलं आहे. एकाच गुन्ह्याबद्दल चारही वर्णात ब्राह्मणाला सर्वात जास्त शिक्षा सांगितली आहे (तो सर्वात ज्ञानी म्हणून.) मुख्य म्हणजे जन्माप्रमाणे नव्हे, तर कुवतीप्रमाणे वर्ण ठरवणारी व्यवस्था त्याने केली आहे. 'शूद्रो ब्राह्मणतामेति' या श्लोकात मनु म्हणतो, 'शुद्र कुळात जन्मूनही ज्याच्या अंगी ब्राह्मण (किंवा क्षत्रिय किंवा वैश्य यांच्याप्रमाणे) गुण, कर्म व प्रवृत्ती असेल त्याला ब्राह्मण (किंवा क्षत्रिय किंवा वैश्य) समजावे. याउलट ब्राह्मण (किंवा क्षत्रिय किंवा वैश्य) कुळात जन्मूनही जो गुणकर्माप्रमाणे योग्य नसेल त्याला शुद्र समजावे.' (श्लोक क्र. १०/ ६५)  एवढंच नव्हे, तर 'मोक्ष मिळवण्यासाठी आवश्यक असणारा परमधर्म शुद्राकडूनही शिकून घ्यावा' असंही मनु म्हणतो. (श्लोक क्र. २ / २३८)                   
४) ही व्यवस्था समजून घेण्यासाठी एक उदाहरण देतो. समजा तुम्ही एका कंपनीचे मालक आहात. शिपायाची, अकौंटन्टची, अधिकार्याची अशा वेगवेगळ्या नेमणुका तुम्ही ज्या त्या इसमाच्या कुवतीनुसार केलेल्या आहेत. उद्या शिपायाची कुवत वाढली तर तो अधिकारी बनू शकेल. पण कुवत वाढलेली नसताना त्याने अधिकार्याचे कामे करता कामा नयेत. तरीही ती केल्यास तो शिक्षेला पात्र होईल. अगदी हीच व्यवस्था मूळ मनुस्मृतीत होती. यात न पटण्यासारखं काय आहे ? 

५) स्त्रीविषयी मनुस्मृतीत काय म्हटलंय ते आता सांगतो. मनु स्त्री -पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही. स्त्रीला तो पुरुषाची दासी मानत नाही. स्त्री ही घराची लक्षुमी असल्याचं तो सांगतो. उदा. हे श्लोक पहा : 'स्त्रियांचा नेहमीच योग्य तो मान राखला जावा, त्यांची अवहेलना केल्यास धर्मकृत्येही निष्फळ ठरतात.' (श्लोक ३/५६) 'ज्या कुळात पत्नी, कन्या, भगिनी, सुना अवहेलनेचे दुःख भोगतात ते कुल नाश पावते. जिथे त्यांचा मान राखला जातो त्या कुळाची भरभराट होते.' (३/५७) स्त्रियांना वेद अध्ययनाचा अधिकारही मनुस्मृतीने दिलेला होता. गार्गी, मैत्रेयी, सुलभा अशा ब्रह्म वादिनी ही त्याची उदाहरणे होत. 

६) मनुस्मृतीत सांगितलेली वर्णव्यवस्था ही गुणकर्माधिष्टीत होती म्हणूनच इल पुरुरवा, भालान्दक वासाश्वसंकिल आणि इलुपपुत्र कवष हे अनुक्रमे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असूनही ऋग्वेदाचे मंत्रवक्ते बनू शकले. 'ऐतरेय ब्राह्मण' या ग्रंथाचा कर्ता ऐतरेय हा दासीपुत्र होता. रामायण लिहिणारे वाल्मिकी, महाभारत रचणारे व्यास किंवा गायत्रीमंत्र निर्मिणारा विश्वामित्र हे ब्राह्मण नव्हते. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. 

७) कौरव पांडव युद्धामध्ये भारताचं क्षात्र तेज लयाला गेलं आणि मनुस्मृतीत सांगितलेली शिस्त बिघडायला लागली. त्यातूनच पुढे बौद्ध धर्मासारखे पर्याय उभे राहिले. मनुस्मृतीच्या विपर्यस्त आवृत्त्या निघू लागल्या. त्यातूनच एक हजार वर्षांपूर्वी अस्पृश्यता निर्माण झाली. पुढे ब्रिटिशांनी आपली संस्कृती हीन पातळीवरची असल्याचा पद्धतशीर प्रचार करून आपल्या मनात न्यूनगंड निर्माण केला. तुम्ही-आम्ही त्याचेच बळी आहोत. म्हणूनच आज मनुस्मृतीला नि प्रत्येक प्राचीन परंपरेला शिव्या देत राहिलो आहोत. 

८) मूळ मनुस्मृती आणि तिची विपर्यस्त आवृत्ती याविषयी डॉ. बाबासाहेबांना कल्पना असावी असं मनुस्मृतीदहन कार्यक्रमाच्या प्रसंगी घेतल्या गेलेल्या शपथेवरून दिसतं.         
२५ डिसेंबर १९२७ या दिवशी महाड इथे बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं त्यावेळी दलित बांधवांना बाबासाहेबांनी खालील शपथ घ्यायला लावली होती :
अ) मी जन्माधिष्ठित चातुर्वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवत नाही.
ब)  मी जातीभेदांवर विश्वास ठेवत नाही. 
क) अस्पृश्यता हे हिंदुत्वावरील लांच्छन असून ते नाहीसं करण्याचा मी प्रयत्न करीन. 
ड) समानतेच्या सूत्रानुसार हिंदू समाजात वावरताना मी खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठलेही बंधन पाळणार नाही. 
इ) अस्पृश्यांना देवळे, पाणवठे, शाळा आणि अन्य सर्व बाबतीत समान हक्क मिळाले पाहिजेत अशी माझी ठाम धारणा आहे. 
यावर खालीलप्रमाणे भाष्य करता येईल :
एक, बाबासाहेबांचा विरोध जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेला होता, मूळ मनुस्मृतीला अभिप्रेत असलेल्या गुणकर्माधिष्ठित वर्णव्यवस्थेला होता असं दिसत नाही. 

दोन, मूळ मनुस्मृतीच्या काळात आणि त्यानंतरही हजारो वर्षांत जाती अस्तित्वात आल्या नव्हत्या. कारण अर्यांमध्ये जातीव्यवस्था नव्हती. त्यांनी स्थानिक अनार्यांकडून घेतली. त्यामुळे जातीभेदांचा संबंध मूळ मनुस्मृतीशी जोडता येणार नाही.  

तीन, अस्पृश्यता अलीकडच्या एक हजार वर्षातली आहे. त्याबद्दल आठ हजार वर्षांपूर्वीच्या मूळ मनुस्मृतीला दोषी धरण्यात अर्थ नाही. 

चार, खाण्यापिण्याच्या बाबतीत मूळ मनुस्मृतीने शूद्रांना कुठलंही बंधन घातलेलं नाही. उलट ब्राह्मणांनाच काही बंधने घातलेली आहेत.

पाच, देवळे- पाणवठे- शिक्षण वगैरे बाबतीत मूळ मनुस्मृतीने सर्वाना समान हक्क आणि संधी देऊ केलेली आहे. तसं नसतं तर ब्राह्मण नसलेल्या कृष्ण द्वैपायन व्यासाला वेदांचं संकलन आणि वर्गीकरण करता आलंच नसतं आणि अनेक शूद्रांना वेदांचे मन्त्रवक्ते बनायला विरोध केला गेला असता.  
९) हे सगळं लक्षात घेता अशी भावना होते की सर्व जातीजमातींच्या अभ्यासू प्रतिनिधींची एक समिती नेमून आज उपलब्ध असलेला मनुस्मृती हा ग्रंथ (प्रक्षिप्त श्लोक वगैरे काढून) शुद्ध केला पाहिजे आणि भारताचा एक अभिमानास्पद राष्ट्रीय ग्रंथ म्हणून त्याचं जतन कसं होईल हे पाहिलं पाहिजे.    

('आर्यभारत' या माझ्या आगामी पुस्तकातून)